Summary of the Book
शिवाजी महाराजांची रोमांचक जीवनकहाणी पुन्हा पुन्हा एकविशी वाटत राहते. करण त्यांच्या आयुष्यात तीनशे पेक्षा अधिक संस्मरणी घटना आहेत. त्यापैकी काही घटना स्तिमित करून सोडणाऱ्या आहेत. प्रस्तुत पुस्तक हे शिवरायांच्या आग्र्यावरील गरुडझेपेची कहानी आहे. हे पुस्तक म्हणजे डॉ. केदार फाळके यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा विद्याचरण भालचंद्र पुरंदरे यांनी केलेला भावानुवाद आहे. प्रारंभी त्यांनी निजामशाही, आदिलशाहीवर लेखन केले आहे.
दुसऱ्या प्रकरणात १६५० च्या काळातील हिंदुस्थानावर प्रकाश टाकला आहे. तिसऱ्या प्रकरणात शाहजी राजांना अटक आणि शिवरायांच्या मुघलांशी आलेला संबंध याविषयी, तर नंतर अफझलखानाच्या वधाविषयी लिहिले आहे. शाईस्ताखानाची बोटे तोडली, सूरतेची लूट, महाराजा जायासिहांची स्वारी या टप्प्यांतून पुढे आग्र्याहून ग्राहून सुटकेचा प्रसंग रंगविला आहे. आग्र्याहून सुटकेनंतरच्या घटनांचाही वेध घेतला आहे.