Summary of the Book
शब्द माझ्या या मनाला त्या मनाशी जोडतो,' असे शब्दांचे व मनाचे नाते उलघडणाऱ्या शंतनू कुलकर्णी यांच्या कवितांचा हा संग्रह आहे. शब्दांबरोबर माणसे, आसपास, नित्यनियमाच्या गोष्टी आणि स्वतःशीच बोलणाऱ्या या कविता आहेत. 'माणसे सांभाळण्याची कला मी जोपासली,' असे स्वतःविषयी सांगतानाच ' चांदण्यांचे शहर माझे नाहीसे झाले कुठे ?' अशी खंतही कवितेमधून व्यक्त करतात.
मात्र, दुसऱ्याच क्षणी ' दिवाळीचे क्षण, उजळले मन, तेजाचे दर्शन.....अंतरंग,' असा आशावादही प्रकट होतो. टू ये अन अंतर्यामी प्रकाश देऊन जा,' असे मागणे ते प्रभूकडे मागतात. क्रिकेट, जतांचे औषध, मोबाईल फोन, खारुताई, वाढदिवस अशा विषयांवरच्या कविताही संग्रहात आहेत. 'नभी उसळल्या धारा, तडतड पडू लागल्या गर, सारख्या निसर्गकविताही वाचायला मिळतात.