Summary of the Book
ही एक प्रेमकहाणी आहे. ओजस हा या कहाणीचा नायक. तो आपल्यासारखाच सर्वसामान्य घरातील आहे. त्याच्या त्याच्या आयुष्याला परीस स्पर्श होतो आणि त्याचे आयुष्य बदलून जाते. तरुण लेखक सौरभ कुलकर्णी यांनी हा बदल त्यांच्या लेखनातून टिपला आहे. ओळख, मैत्री, प्रेम अशा टप्प्यांतून ही कहाणी पुढे सरकते. प्रेमाच्या परीस स्पर्शाने आयुष्य बहरते, फुलते पण हे फुलने कायमचे टिकणारे नसते.
समज-गैरसमजांच्या कट्याकुट्यांमधून ते ठेचकाळते. कुलकर्णी यांनी लिहिलेली ही कथा ओघवती आहे. तरुण पिढीची सध्याची मानसिकता त्यातून
प्रकट होते. तरुणांच्या भाषेतूनच ती वाचकांपर्यंत पोहोचते. त्यातील खुणा तरुण पिढीलाही ओळखीच्या वाटतील अशा आहेत.