Summary of the Book
हरीश हातवटे यांनी आजीच्या प्रेमातून यात विविध कविता दिल्या आहेत. आजी आणि नातू यांच्यातील भावबंधाचा वेध घेत त्यांनी या कविता केल्या आहेत. त्या कुठल्याही नातवाला आपल्याच वाटतील. यात आजीच्या प्रेमाबरोबरच काही घरांत आजीकडे अक्षम्य दुर्लक्ष होते, त्यांच्याही वेदना यातील कवितांतून उमटल्या आहेत. आजी हे संस्काराचे विद्यापीठ असल्याचे कवी आवर्जून सांगतो.