Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाच्या आर्थिक राजधानीवर मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासातील भळभळणारी जखम आहे.
आज या हल्ल्याला सात वर्षे झाली. मुंबईला तीन दिवस वेठीस धरणाऱ्या, दहा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ओलिसांची सुटका करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीनही दलांनी एकत्रितपणे प्रथमच लढा दिला. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी ) ब्लॅक कमांडोजनी कडवी झुंज देत मुंबईकरांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडविले.
पण हा मुकाबला आपण बराचसा भांबावून गेल्यासारखा केला, असे मत 'ब्लॅक टोर्नाडो ' मधून नोंदविले आहे. हल्ल्याला तोंड देताना काय घडले, हे संदीप उन्नितान यांनी या पुस्तकातून लिहिले आहे. हा अनपेक्षित हल्ला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कसा झेलला, टोळीयुद्धासाठी अंदाजामुळे आधी गाफील राहिलेले मुंबई पोलिस,
दहशतवादी हल्ला झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या जुन्या शस्त्रांनी लढणारे पोलीस, मुंबई धोक्यात असताना बाईटसाठी धडपडणारा मीडिया, एनएसजी घटनास्थळी पोचल्यानंतर पुढील तीन दिवस सुरु असलेली कारवाई, त्यात आलेल्या अडचणी, त्यावर मत करीत ब्लॅक कॅट कमांडोजनी दहशतवाद्यांशी दिलेली झुंज याचे वस्तुनिष्ठ वर्णन यात आहे. याचा मराठी अनुवाद समीर कर्वे यांनी केला आहे.