Summary of the Book
भारतीय आहार विशेषतः महाराष्ट्रातील आहार परिपूर्ण मानला जातो. तरीही आजारांचे प्रमाण वाढतेच आहे. तरुण वयातच शरीरात अनेक घटकांची कमतरता निर्माण झालेली दिसते. त्यासाठी आपला आहार कसा आहे, याची माहिती करून घेणे अवश्यक आहे.
श्याम रानडे यांनी या पुस्तकात आहार वा आरोग्य या संदर्भातील शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे. अन्नघटकांचे गुणधर्म सांगून शरीरस्वास्थ्यासाठी व आपली शरीरयंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी कोणत्या अन्नघटकांचे किती प्रमाण असायला हवे आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली आहे. उष्णता व कार्यशक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार, प्रदूषण आदी स्वतंत्र प्रकरणेही आहेत.