Summary of the Book
सुट्टीचा दिवसांत काही युवक धाडसी प्रवासाला निघतात. असाच धाडसी प्रवास पुण्याचे अजित हरिसिंघानी यांनी मोटार सायकलवरून पुणे ते काश्मीर असा केला. त्यांनी सुमारे ४३०० कि.मी.चा प्रवास डहाणू, अहमदाबाद, माऊंट अबू, जयपूर, नवी दिल्ली, मनाली, लेह, दास, कारगील, श्रीनगर, पटनीटॉप आणि जम्मू या मार्गाने केला. अशा या रोमहर्षक व जिकरीच्या प्रवासातील अनोखे अनुभव त्यांनी 'वन लाइफ टू राइड' या नावानं इंग्रजीत कथन केले आहेत. सदर पुस्तकाचा अनुवाद सुजाता देशमुख यांनी 'बाइकवरूचं बिऱ्हाड' नावानं केला असून राजहंस प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केलं आहे.