Summary of the Book
'मराठी माणसे धंदा करत नाहीत, नोकरीकडेच वळतात,' हा समज आता जुना झाला. डॉ. मनोहर जोशी यांनी या पुस्तकात दहा उद्योजकांच्या मुलाखतींचे संकलन केले आहे.
बबन शेळके, आनंद देशपांडे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, विजय ढवळे, आशालता कुलकर्णी, धनंजय दातार, पराग गाडगीळ, शंतनू भडकमकर, सुरेश हावरे आणि प्रसाद लाड या यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती पुस्तकात वाचायला मिळतात.
व्यवसाय सुरु करताना, व्यवसाय करताना आलेल्या अडचणी, नेमकी प्रक्रिया कशी होती, कर्मचारी आदी मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. जोशी यांनी यशस्वी, अयशस्वी व्यक्ती, श्रीमंत होण्याच्या बारा पायऱ्या आदींवरही पुस्तकाच्या प्रारंभी चर्चा केली आहे.