Summary of the Book
खानदेश म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव या तीन जिल्ह्यांत अहिराणी हि बोली बोलली जाते. रामायण - महाभारत या प्रदेशाचा उल्लेख ऋषकदेश असा आहे. या प्रदेशाच्या प्राचीन इतिहासाबरोबर येथील बोलीलाही मोठा इतिहास आहे. तो सांगताना खानदेशाच्या म्हणींचा अभ्यास डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी 'खानदेशातील म्हणी'मध्ये केला आहे. म्हणी या लोकवाड्मयाचे सूत्रात्मक स्वरूप असून, प्रसंगानुरूप योग्य वाटणारे, वैविध्यता स्वीकारणारे असे बोधपर लहान वाक्य, अशी तिची ढोबळमानाने व्याख्या करताना म्हणींचा इतिहास दिला आहे.
विविध भाषांमधील म्हणींची तुलना करण्यासाठी त्यांचे विषयनुरूप, रूपात्मक, अलंकारिक, वाक्यरचनेनुसार, व्याकरणानुसार वर्गीकरण, म्हणींचे काळानुसार वर्गीकरण, लयबद्धता, अलंकारिता, म्हणींतील शब्द व आशय, शारीरिक अवयव व मानवी जीवनाशी संबंधित म्हणी, नातेसंबंध, घर व घरातील वस्तू, खाद्यसंस्कृती, कृषी संस्कृती, आर्थिक जीवन, जाती व्यवस्था, राज्य, गाव कारभार, इतिहास, अंधश्रद्धा, सण - उत्सव, निसर्ग या सर्वांशी संबंधित म्हणींविषयी माहिती यात आहे.