Summary of the Book
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ में १९६० रोजी झाली. त्यापूर्वीपासून आजतागायत वसंत (दादा) देशपांडे वृत्तसंकलन करत आहेत. महाराष्ट्र निर्मितीचा सोहळा, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अधिवेशन, यशवंतराव चव्हाण यांची भाषणे, सत्ताबदल, आपत्ती व्यवस्थापन आणि संकटांचा मुकाबला अशा विविध अंगांना स्पर्श करत त्यांनी अचूक संदर्भांसह हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
या ग्रंथाची भाषा अथपासून इतिपर्यंत वृत्तपत्रीय आहे. हे लिखाण ललित करण्याचा मोह देशपांडे यांनी टाळला आहे. वृत्तपत्रीय लिखाणात अचूकता, नेटकेपणा आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे या तीन घटकांना सर्वाधिक महत्त्व असते. यच तंत्राचा अवलंब देशपांडे यांनी केला आहे.