Summary of the Book
भारतीय संस्कृतीतील महाभारत हे महाकाव्य सामाजिक जीवनावर, समजात घडणार्या गोष्टींवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. महाभारताचा संबंध इतिहासकाळाशी जोडल्यास त्यामागील श्रद्धा, भक्तिभाव, दैवी चमत्कार,वर-शाप हे बाजूला ठेवले तर नीतिशास्त्र, तत्वज्ञान, समाजशास्त्र, तर्कशास्त्र, मानववंशशास्त्र याचे मूल्यमापन त्या संदर्भात करता येते. तसा प्रयत्न डॉ. रवींद्र शोभणे यांनी 'महाभारताचा मुल्यवेध' मधून केला आहे. जे समाजात घडते ते महाभारतात घडते, जे समाजात घडत नाही ते महाभारतात घडत नाही, असे व्यासांनी सांगितले होते. त्याचा मुल्यवेध यात घेतला आहे.