Summary of the Book
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असते’, असे प्रेमाचे महत्त्व सांगणारे मंगेश पाडगावकर छोट्यांसाठी ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ असेही विचारतात. त्यांची कविता रसिकांना भुलविते. अगदी केव्हाही ओठावर येते. त्यांनी त्यांच्या कवितांमधून माणूस शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गद्य लेखनातही त्यांनी तो प्रयत्न केला. त्यांचे समृद्ध गद्यलेखन एकत्रित स्वरूपात ‘मंगेश पाडगांवकर स्नेहगाथा’मधून वाचायला मिळते. त्यांचे मित्र, त्यांचे बरोबरीचे लेखक, त्यांनी लिहिलेले समीक्षापर लेख, त्यांनी घेतलेल्या मुलाखती असे विविध लेखन यात आहे. हे आशयघन लेखन वाचून कवी मंगेश पाडगावकर यांचा लेखक म्हणून नव्याने परिचय होतो.