Summary of the Book
औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरषोत्तम भापकर यांनी सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पान राबविताना विविध प्रयोग केले. महापालिकेचे शिक्षक व सुशिक्षित युवक-युवतींच्या मदतीने 'भाऊ-दीदी' हा उपक्रम राबविला. शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, हे याचे उद्दिष्ट होते. ते करताना शिक्षकांना आलेले अनुभव 'शोध मुलांच्या मनाचा' मध्ये शब्दबध्द केले आहे. या कथांमधून विद्यार्थ्यांचे शाळेतील, घरातील, समाजातील वर्तन समजून घेता येते. तसेच त्यांच्या समस्या, गुणदोष, विचार, सवयी, इच्छा, मानसिक ताण लक्षात येतात. मुलांच्या मनातील भीती, दडपण दूर करून त्यांना फुलायला हे पुस्तक मदत करते. याचे लेखन रेणू दांडेकर यांनी केले आहे.