पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो, यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे. तोंडवळा, प्राविण्य व प्रवृत्ती, जन्मखुणा, आवाज अशा गोष्टींनी पुर्नजन्म ओळखता येतो. पुनर्जन्माचा शास्त्रीय पुरावा, आत्मा, मृत्यूची भीती, मृत्यू समीप अनुभव, मोक्ष आदींवरही चर्चा केली आहे.
मानवी जन्ममृत्यूच्या चक्राचे फलित काय आणि हे चक्र केव्हा थांबेल या मुद्द्यावर तात्विक आणि आध्यात्मिक विचार केला आहे. यासह पुनर्जन्म, मृत्युनंतरचे जीवन या विषयांचा अभ्यास करणारे डॉ. ब्रायन वाईज, डॉ.स्टीव्हन्सन, डॉ. सतवंत पासरिचा यान्ह्च्या संशोधनाची माहितीही दिली आहे.
‘पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य?’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5614508552115004599