Summary of the Book
अरुण शेवते यांनी साहित्याच्या क्षेत्रात आपले पहिले
पाउल टाकले ते कवी म्हणून. त्या पहिल्यावहिल्या
कवितांतूनही त्यांच्या प्रतिमेचे वेगळेपण जाणवले. हा
सातत्याने नवेपणाचा शोध घेणारा, संवेदनाक्षाम, भावनेला
आव्हान करणारा कवी आहे हे त्यांच्या कवितेप्रमाणे
त्याच्या गद्य लेखनातून आणि तुयांनी संपादित केलेल्या
अनेक पुस्तकांतून जाणवले. जीवन व निसर्ग यांच्याविषयी
अपार प्रेम असलेला. मानवी मनाचा थांग घेणारा,
माणसांशी असलेला नातेसंबंध जपणारा हा कवीच त्यांना
चरित्र, व्यक्तीचरित्र यांसारखे अन्य साहित्यप्रकार
हाताळण्याची संपादनासाठी वेगळे कल्पक विषय
शोधण्याची प्रेरणा देत आला आहे. त्यांची निर्मितीशक्ती
अखंडपणे जागृत आहे.
विजया राजाध्यक्ष