Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/
$
7.20
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
श्री. भालचंद्र देशमुख हे प्रशासनाच्या सार्या सोपान पायर्या चढून सर्वोच्च पायरीवर जाऊन आले. त्यांच्या लिखाणातून भारताच्या चाळीस वषा|च्या राजकीय व प्रशासकीय इतिहासाच्या कितीतरी खिडक्या आपल्यासाठी उघल्या गेल्या आहेत. त्यातून आपणास इतिहासाचे दर्शन घडते. ते सारे वाचताना नकळत आपण श्री. देशमुख या व्यक्तीपासून दूर होऊन त्या घटना न्याहाळतो. आपले स्वनिष्ठ लिखाण जाणवू न देता त्यातील इतिहास, मानवी स्वभाव, सांस्कृतिक मूल्ये हेच जेव्हा जाणवू लागते तेव्हा त्या लेखकाचे ते लिखाण यशस्वी झाले आहे असे म्हटले पाहिजे.
श्री. भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुख हे काही साहित्यिक नाहीत. त्यामुळे त्यांनी लिहिताना कुठेही उपमा, उत्प्रेक्षा, वगैरे साहित्यिक अलंकार लिहिले नाहीत. कोणावर टीका केली नाही. आपली मते मांडली नाहीत की कोणाची मते खोडून काढली नाहीत. कसलाही अभिनिवेश न आणता त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेत जे घडत गेले, जसे घडत गेले तसे निखळ प्रामाणिकपणे मांडलेले आहे. वाचकाला हा प्रामाणिकपणाच भावतो व तो विश्वासाने या निवेदकाचे शब्द मनात मुकाट्याने ग्रहण करीत जातो.
आपल्या चाळीस वषा|च्या सेवाकाळात श्री. देशमुख यांना शेकडो व्यक्ती भेटल्या, त्यांची नावे, प्रसंग, षटना, काळ इत्यादी त्यांनी अचूकपणे लिहिलेले आहे. सुमारे 470 व्यक्तींची नावे त्यांनी या पुस्तकात दिली आहेत. हे सारे नीट आठवण्यासाठी त्यांची मरणशक्तीही मुळात चाुंगली आहेच. पण त्यासाठी ते वेळोवेळी कुठेना कुठे तरी नोंदी करून ठेवीत असले पाहिजेत. एखाद्या इतिहास संशोधकाच्या किचकट कामासारखे हे काम आहे. आपल्याला शेवटी या सवा|वरती एक पुस्तक लिहायचे आहे याचे त्यांना भान होते. त्यांनी या पुस्तकाचा जो प्रकल्प पुरा केला त्यामुळेच आपल्याला सरकारी यंत्रणेची चक्रे वरिष्ठ पातळीवरती कशी हलतात, तिथे कितीतरी नाट्यपूर्ण घटना घडत असतात, नाट्ये, उपनाट्ये, मानवी भावनांचे प्रगटीकरण, हेवेदावे, कारस्थाने व कारवाया, सारे काही आपल्याला कळू शकले आहे. अन् हे सारे सत्य असल्याने आपण ते वाचताना स्तिमित होतो, स्तंभित होतो, थक्क होतो.
वर्तमानपत्रातील बातम्या आणि सत्य यात नेमके किती अंतर असते हे श्री. देशमुख यांच्या लिखाणावरून समजून येते. सत्तेच्या राजकारणात प्रशासकीय कर्मचारी हा केवळ एक यांत्रिक बाहुले नसून तोही आपल्या अक्कलहुशारीने त्या जगड्व्याळ शासकीय यंत्रणेची चाके अशी काही फिरवू शकतो की त्यामुळे समस्या सुटू शकतात. श्री. देशमुख यांनी आपल्या व्यवहारचातुर्याने असे अनेक प्रश्न सोडवल्याचे या पुस्तकात दिसून येते. एका मध्यमवर्गीय मराठी माणसाने सत्तेच्या शिखरापय|त केलेली वाटचाल ही कोणत्याही मराठी माणसाला नक्कीच अभिमानास्पद वाटेल.