Summary of the Book
मतिमंद मुलांच्या व्यथा आपल्याच व्यथा समजून जणू शुभाताई ते जीवन जगत आहेत आणि त्या वेदना त्यांच्या लेखणीतून बाहेर व्यक्त करत आहेत. इतक्या समरसतेने त्यांनी हे ‘आधारमाया’ साकारलेले आहे. २०० मतिमंदांना आजीवन संगोपनाची सावली देणारी बदलापूरमधील ‘आधार’ ही राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अलौकिक सेवाभावी संस्था. आधारचे महत्व आणि ममत्व सांगणारी संवेदनशील कहाणी.