Summary of the Book
भावनिक शब्दांत कविने आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, ओंजळ ती दिसते छोटी, पण असते खूप मोठी, आपली सुख-दुःख त्यात मावतात, आपल्या आकांक्षा तिच्यात सामावतात, मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात, ओजंळीत मायेचं चांदण ठेवता येतं, ओंजळीत आकाश उतरू शकतं आणि सप्तसागराचं पाणीही बसू शकतं, ओंजळीत म्हणे ब्रह्मांडालाही जागा असते, सकाळी जग आल्यावर प्रथम दोन्ही हात जोडून करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे.