Summary of the Book
भारताने जगाला शून्याची देणगी दिली आणि गणिती विश्वाचे समीकरणच बदलले, गणित, विज्ञान, भौतिक, खगोल, ज्योतिष आदी विविध शास्त्रांचा अभ्यास करून भारतीयांनी अनेक नवे प्रयोग जगापुढे मांडले. त्यातील काही गणिततज्ज्ञांनी ओळख सं. पां. देशपांडे यांनी 'आधुनिक भारतीय गणिती'मधून करून दिली आहे.
गणित आणि खगोल विज्ञानात आपल्या संशोधकांनी मांडलेले विचार प्रा. केरुनाना छत्रे यांनी इंग्रजी ज्ञानाचा कसोटीवर पडताळून पाहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणित व पदार्थ विज्ञानावर पुस्तके लिहिली. लोकमान्य टिळकांचे ते गुरु होते. लोकमान्यही गणिताचे व्यासंगी होते.
त्यांनी स्वतः पंचांग तयार केले. 'ओरायन' हा ग्रंथ लिहिला.
राजकीय संख्याशास्त्र म्हणून नावाजलेले गणेश व्यंकटेश जोशी, रामानुजन, रँग्लर र. पु. परांजपे गणिताचार्य, द. वा. केरकर, प्रा. वि. वा. नारळीकर, डॉ. अच्युत शंकर आपटे, प्रा. देवव्रत लाहिरी गणितातील भीष्म पितामह प्रा. अण्णासाहेब रंगनाथ राव, डॉ. श्रीराम अभ्यंकर आदी २६ गणितज्ञांची माहीती, त्यांची कामगिरी यातून विशद केली आहे.