Ravindra Kamthe
13/11/2019
काल चपराकचे संपादक घनशाम पाटील सरांच्या बरोबर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या घरी चपराकचा दिवाळी अंक भेट द्यायला गेलो होतो त्यावेळेस त्यांना माझे नुकतेच प्रकाशीत झालेले"तारेवरची कसरत" हे पुस्तक भेट दिले.
आज सकाळीच जोशी सरांचा फोन आला आणि मी उडालोच. सरांनी रात्री १ ते ३ ह्या वेळात माझे पुस्तक वाचले व मला अभिप्राय देण्यासाठी फोन केला होता. सर म्हणाले "अहो तुम्ही किती छान अनुभव लिहीले आहेत! पुस्तक हातात घेतल्यावर वाचून संपवल्याशिवाय खाली ठेवण्याची इच्छाच झाली नाही. तुमचे खूप कौतुक आणि अभिनंदन. एका लेखातले डाँ अविनाश भोंडवे तर माझे विद्यार्थी आहेत. त्यांना मला फोन करायला सांगाल का." "तुमची लिखाणाची ओघवती शैली आणि प्रांजळपणा तर मनाला भावतो. तुमच्या अनुभवावरून खूप काही घेण्यासारखे आहे. असेच लिहीत रहा. आणि जमले तर माझे 'बखर एका सारस्वताची' हे ६००पानांचे आत्मचरित्र वाचा व तुमचा अभिप्राय कळवा". सर भडभडून बोलत होते आणि माझ्या लिखाणाचे अतिशय आत्मियतेने कौतुकच करत होते. इतक्या जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकाचा हा अभिप्राय म्हणजे मला पुरस्कारच वाटत होता. अभिमानाने माझी मान एकदम ताठ झाली होती आणि