Summary of the Book
गेल्या दोन दशकांमध्ये सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले . याचा परिणाम अर्थातच आपल्या जीवनशैलीवर झाला . या बदलांचा आढावा ' कथाश्री ' या दिवाळी अंकात घेण्यात आला आहे . संपर्क क्रांतीचा उद्गाता असलेल्या स्टीव्ह जोब्जला हा अंक अपर्ण केला आहे .
या अंकात दीपक घारे , दीपक घैसास यांचे ' बदल कसे घडून आले आहेत आणि येत आहेत ' याचा आढावा घेणारे लेख आहेत . यात भविष्याचा वेध घेत २०४५ साली मानवी संस्कृतीचा लोप होऊन तिच्या जागी मानवी बुद्धीपेक्षा आधिक बुद्धीमान आणि गतिमान अशा कृत्रिम बुद्धितत्तेची नवी संस्कृती उदयाला आली असेल , असे संशोधकांचे निरिक्षण नोंदवले आहे . याशिवाय विजया राजाध्यक्ष , संध्या रानडे आदी लेखकांच्या कथा असून शरद उपाध्ये , डॉ . नरेंद्र दाभोळकर , अॅड . असीम सरोदे , अविनाश धर्माधिकारी आदींच्या मुलाखतीही यात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत .