Dr. Rujuta Vinod
18/11/2012
जोपर्यंत सगळं ठीक चाललय तोपर्यंत बुध्दिवादी लोक देवाला मानतात किंवा इतरांनी त्याला मानला तर त्यांची हरकत नसते. मात्र, वादळ, सुनामी-भूकंप-अवर्षण/पूर यासारखी एखादी प्रलयंकारी नैसर्गिक आपत्ति आली किंवा युध्दामध्ये, अतिरेकी हल्ल्यांमध्ये भीषण अत्याचार झाले की ते म्हणतात - "आता कुठे गेला तुमचा देव? तो काहीच न करणारा आहे. त्याला इतके अत्याचार कसे बघवतात? तो जर खरा देव असेल तर तो निष्पाप माणसांना वाचवेल. पापी माणसे मजा करतात आणि काही संबंध नसलेली माणसे मरतात-जायबंदी होतात. कुठे गेला तुमचा न्याय करणारा देव?" मग थोडेसे देवाला मानणार्या माणसांचा बुध्दिभेद होतो. तीही देवाला मानणं सोडून देतात आणि त्याचा तिटकारा करू लागतात. मी ही यावर बरीच वर्षे विचार करीत होते. सरळ दिसतय ते विपरित पहाणं, वाकडा अर्थ काढणं; कुठुन तरी देवाचे महत्व अमान्य करणं, त्यात भूषण मानणं यातून मी ही गेले होते. अनुग्रह घेतल्यावर महाराजांनी सांगितलेल्या वचनांवर आधारित बेलसरेबाबांची पुस्तके मी जशी जशी वाचू लागले, तशी माझी दृष्टी साफ होत गेली. श्रीएकनाथमहाराजांचे ग्रंथ मला फार उपयोगी पडले. वेदव्यासरचित पुराणांनी आणि गीतेने मला सत्य सांगितले अचानक चमत्कार