Summary of the Book
'अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान ' हे सांगताना गुरुमाउली भागवत यांनी स्वतःच्या आत्म्याचा आवाज ओळखून आयुष्यात समर्थ होण्याची शिकवण 'आदेश'मधून दिली आहे.
दहा वर्षानंतर किशोरवयीन मुलांनी आपला दृष्टीकोन बदलून गंभीर व्हायला हवे. अभ्यास आवडीने करून दहावीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. दैवी पातळीवरील सत्संगात साधकाने खऱ्या भक्तीने महत्त्व जाणायला हवे.
साधक घडताना विनम्रता हवी. खरा साधक घडताना त्याचा प्रवास एकरूपत्वाकडून स्वस्वरूपाकडे होतो. विकारांना दूर ठेवणारा साधक बिघडत नाही, असे ते म्हणतात.
या संदर्भातील विवेचनासह निष्काम भक्ती, बालपणापासून केलेली भक्ती, भक्ती - महासुखाची जननी, विनम्रतेचे फायदे सांगितले आहेत. जीवनाला सामोरे जाताना भक्ती, साधना केल्यास सुंदरतेचा अनुभव कसा येतो, हेही सांगितले आहे.