Summary of the Book
भारताच्या इतिहासात १९४७ हे वर्ष अत्यंत महत्वाचे. त्यापूर्वी १९४६ मध्ये काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यात दुरावा निर्माण झाला. देशातील परिस्थिती बिकट होऊ लागल्यानंतर सत्तांतर अनिवार्य व लवकरात लवकर व्हावे, याची जाणीव तेव्हाचे व्हॉइसरॉय बेव्हेल यांना झाली होती.
नंतर व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी अखेर १५ ऑगस्टचा मुहूर्त हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निश्चित केला. हा इतिहास व त्या काळात घडलेल्या घडामोडी याचे कथन वि. स. वाळिंबे यांनी १९४७ मध्ये केले आहे. गांधीजी - चर्चिल संबंध.
नेहरू, जिना यांची भूमिका,माउंटबॅटन- गांधीजी, नेहरू जिना यांच्या भेटी, त्या वेळेचे हिंसक वातावरणम जीनांचा उलटलेला युक्तिवाद, सुऱ्हावर्दी यांचे भंगलेले अखंड व स्वतंत्र बंगालचे स्वप्न, पंजाबचा तिढा, स्वातंत्र्यानंतरची नेत्यांची आकांक्षा यामधून भारताच्या इतिहासातील थरारक कालखंड यातून उभा केला आहे.