Ashok Salve
12 Jun 2019 05 30 AM
मुंबईचे खरे मालक कोण? हे य दि फडके यांनी लिहिलेले पुस्तक वाचायला अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक आहे. मुंबईत जन्म घेतलेल्या सर्वांनी हे वाचलेच पाहिजे असे आहे. मुंबईचा ईतिहास जिवंत करणारी कलाकृती आहे ही. आजच्या पायधुणी भागाला ते नांव पडण्याचे कारण म्हणजे एके काळी लोकं मुंबादेवीच्या दर्शनासाठी बोटीने येत आणि मुंबादेवीच्या दर्शनासाठी उतरल्यानंतर मंदिरात जाण्याआधी तिथे पाय धुवून जात, म्हणून त्या भागाला ते नांव पडले. अशी आणि खूपच मनोरंजक माहिती ह्यात आहे.