Summary of the Book
अपत्यप्राप्तीनंतर दाम्पत्याची जबाबदारी वाढते. बाळाची उत्तम वाढ होणं त्याच्या माता-पित्याच्या हातात असत. मुल वाढविताना आवश्यक असणारी सर्व माहिती वैद्य शुभदा वेलणकर यांनी या पुस्तकात करून दिली आहे. हि सर्व माहिती आयुर्वेदाच्या अंगाने येते. मुल जन्माला आल्यापासून १६ वर्षांपर्यंतचं वय म्हणजे 'बाल' असं संबोधण्यात आलं आहे. बालकाची नाळ कापण्यापासून तेल लावणं, नांव ठेवणं, कान टोचण, दूध पाजणं इथपासून ते बालकाला खेळणी कोणती द्यावीत, त्यानं काय खावं या सर्वांबद्दल वैद्य वेलणकर यांनी मार्गदर्शन केलं आहे. चार ते १६ वर्षे वयाच्या मुलांना होणाऱ्या आजार आणि त्यावरील औषधे याविषयीही विस्तृत माहिती पुस्तकात वाचायला मिळते. किशोरावस्थेतील मुला-मुलींच्या शरीरात आणि स्वभावात होणारे बदलाही लेखिकेने टिपले आहेत.