Summary of the Book
जनहिताय, जन्सुखाय, अंतर्नाद हि तीन पुस्तके गुरुमाउली भागवत यांनी यापूर्वी लिहिली आहेत. 'आनंद पर्व ' पुस्तकातील विविध अध्यायातून त्यांनी अध्यात्मावर विवेचन केले आहे.
या पुस्तकात त्यांनी दांभिक व भक्तीस्तोम माजवणाऱ्या सामाजिक प्रवृत्ती व सर्वव्यापी परमेश्वराचे दर्शन घडविले आहे. तसेच, अभिमान व विकारांमुळे होणारी त्यांची स्थित्यंतरे या दुर्गुणांचे साद्यंत वर्णनही त्यांनी यातील एका अध्यायात केले आहे. माणूस ईश्वराच दान संपूर्ण वापरत कस व का आणत नाही, माणसाच्या स्वैराचाराला तो कसा लगाम घालतो हेही त्यांनी मांडले आहे. मानवी जीवनाच इंगित कशात आहे हेही त्यांनी भावूकतेने मांडले आहे. आनंद पर्व हे पुस्तक अक्षय आनंद देणारे तसेच मार्गदर्शन करणारे आहे.