Summary of the Book
नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार... त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार... कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार...!
माणसाला भावना अससात, तशी सारासार विचाराची शक्तीही असते. वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात क्षणिक सुखांच्या परिणामांचा माणसानं विचार केला, तर...
भावनेपोटी काही वाटणं आणि वाटतं, तसं प्रत्यक्ष करणं यांतला फरक त्याला कळू शकतो !
तसं झालं नाही, तर अधान्तरी लोंबकळणं अटळ आहे ! अर्थात हे असं सोपं करून सांगणं सोपं आहे !
तसं नसतं, तर या कादंबरीतली पात्रं हृदयाला भिडता भिडता माथं का फिरवून टाकती ?
वाचून झाल्यावर दीर्घकाळ पदोपदी आठवत राहील, अशी एक धुंद कादंबरी ... ‘चक्र’, ... ‘स्वगत’ ‘अथांग’... ‘धर्मानंद’ यांच्या परंपरेतली.....!