Summary of the Book
प्रेमचंद यांच्या कथा इतक्या वर्षापूर्वी लिहिलेल्या असूनही अगदी आजच्या जमान्यात, वातावरणात चपलख बसणा-या आहेत. समाजातल्या आपल्या स्थानाच्या जोरावर बेकायदा काम करून घेण्यासाठी लाच देऊ करणारे पंडित अलोचीदान असोत, संपत्तीसाठी आत्मा विकणारा गुरुसेवक आसो, मनातली जीवघेणी घालमेल सोसणारी म्हातारी काकी असो या आणि इतरही विषयांवरच्या ब-याच वेगवेगळया कथा वाचल्यावर आजही असंच चाललयं असं म्हणावंसं वाटतं आणि हे साहित्य काळातील आहे असं वाचकांना पटतं.
त्यांच्या प्रतिभेच्या अविष्कारातून निर्माण झालेल्या या कथांना एक प्रकारचं अमरत्व लाभलं आहे. असं वाचकांना नक्कीच जाणवेल.