Summary of the Book
चैत्रालीचा हा २९ वा दिवाळी वार्षिकांक ‘स्पर्श’ या विषयावर गुंफलेला आहे. स्पर्श या शब्दाचा आवाका आणि स्पर्शातून निर्माण होणार्या भावभावना या मनावर किती खोलवर रुजत जाणार्या असतात, याचा धांडोळा या अंकातून वाचकांपुढे येतो. आई-बाळ, दिग्दर्शक-कलाकृती, नववस्त्र-आपण अशा स्पर्श संवेदनेतून निर्माण होणार्या जाणिवा किती व्यापक अन् गूढ असू शकतात; तसेच स्पर्श कृतार्थतेचा, जीवन घडविणारा परीस स्पर्श या स्पर्शाची थोरवी शब्दांपलिकडचीही असू शकते. अशा सर्व‘स्पर्शी’ विषयांना या अंकातून स्पर्श करण्याचा प्रयत्न प्रवीण दवणे, सुधीर देव, डॉ. अरुण मांडे, अरविंद हेब्बर, कर्नल अरविंद जोगळेकर, अशोककुमार वैद्य व इतर नामवंत साहित्यिकांनी केला आहे. उगवतीची पायवाट घेऊन त्यावर प्रवीण दवणेंची कविता असे मन प्रसन्न करणारे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते.