कोकणातील खेडय़ांतुन कष्टकरी स्त्रियांच्या वेदनेच्या आवाजाचा प्रतिध्वनी ‘आवानओल’ या कवी अजय कांडर यांच्या कवितेमधुन आपल्याला ऐकू येतो. तळकोकणातील या कष्टकरी स्त्रियांचं लोकजीवन आणि इतर कष्टही तिच्या बोलीसह मराठी कवितेत प्रथमच वाचायला मिळालं. भातपेरणीच्यावेळी भरपुर पाऊस आवश्यक असतो. त्यात रोपं लावली जातात. मग ती उचलून दुसरीकडे पेरणी केली जाते. जर पुरेसा पाऊस आला नाही तर ही रोपं जमेल तेवढ्या पाण्यात कसंही करून जगवली जातात. अशी अपु-या पाण्यावरची रोपं जगवण्याला ‘आवान’ असा शब्द आहे. कवी अजय कांडर यांनी यापासून 'आवानओल' असा शब्द तयार केला. अतिशय सुन्दर आहे हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावं.