Summary of the Book
भारत ही संतांची भूमी आहे. संतांनी वैश्विक मूल्य व माणुसकीची शिकवण दिली. प्रपंच करून परमार्थ करण्यास शिकविले. त्यांच्या अभंगातून सर्वसामान्यांना आनंद शोधता आला. या संतांचा विविध कार्याचा विचार करणारे शोधनिबंध 'भारतीय संतांचे योगदान'मधून संकलित केले आहेत.
विविध भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, वाणिज्य, विधी आणि व्यवस्थापनशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासकांनी हे लेख लिहिले आहेत. संत नामदेवांचे भक्तीकार्य, त्यांच्या वाड्मयाचा अभ्यास, संत चोखोबा व त्यांच्या परिवाराचे समाजप्रबोधनपर अभंग, ज्ञानेश्वरीतील पर्यावरण विचार, धार्मिक व सामाजिक सुधारणांमधील विविध संतांची कामगिरी,
संत चोखोमेळा व त्याचे कुटुंबीय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, एकनाथांची नैतिक भूमिका, मुक्ताई, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या संत कवियत्रींच्या स्त्री संवेदना, संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन, जनाबाईचे अभंग, संत एकनाथांचे भारुड, पसायदान,
भारतीय संतांचे प्रादेशिक भाषेतील योगदान, आगळेवेगळे संत रामदास व त्यांचे शैक्षणिक विचार, ग्राहकसंरक्षणार्थ संतांचे योगदान, महाराष्ट्राबाहेरील संत अशा अनेक विषयांवरील व मराठी, हिंदी, इंग्रजीतील शोधनिबंधातून संतांच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला आहे.