Summary of the Book
या पुस्तकात चारही युगांची वर्णने आहेत. आजच्या कलियुगापेक्षा किती वेगळे जग आधीच्या युगांमध्ये होते ते यावरून समजते. त्यावरून रामायण-महाभारतातील महान व्यक्ती व त्यांच्या चरित्राचे संदर्भ आजच्या युगातील संदर्भाप्रमाणे लावले तर सामान्य माणसाचा कसा बुध्दीभेद होतो ते लक्षात येते. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके आधीचे वातावरण व त्यातील माणसे वेगळ्या प्रकारचे जीवन जगत होती. कालाचे परिमाण-वयोमान-मानसिक घडण-सामाजिक मूल्ये ही कशी बदलत जातात हे समजत गेल्याने आता मी कसे जगायला हवे हे निश्चितपणे समजते व मन शांत व्हायला मदत होते.