Summary of the Book
फुले-आंबेडकरी विचारानं संस्कारित झालेला एक सामाजिक कार्यकर्ता, एक साहित्यिक, ज्ञानाविषयी खोलवर आस्था असणारा एक बुद्धिप्रामाण्यवादी अशा लक्ष्मण गायकवाडांनी 'बुद्धाची विपश्यना' हे पुस्तक लिहिलेलं आहे. विपश्यनेत आलेल्या अनुभवाचं कथन त्यात आहे. या कथनात त्यांचं प्रामाणिक पारदर्शीपण दिसतं. वाचकाला हे त्यांच्या शब्दांतून जाणवतं. पण ध्यानधारणेतला सगळा अनुभव शब्दांच्या पकडीत येईल असं नाही. त्या अनुभवातील काही क्षण अव्यक्त राहत असतात. त्यांना शब्दांचा सहवास मानवत नसतो. ते क्षण फक्त भोगायचे असतात.