Summary of the Book
पाकिस्तानच्या जन्मापासूनचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवणारे राजकीय कार्यकर्ते बी. एम. कुट्टी यांचे हे राजकीय आत्मचरित्र. पाकिस्तानात लोकशाहीची पाळेमुळे रुजावीत, सामाजिक न्याय व शांतता यांचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी ते गेली अनेक वर्ष निष्ठेने काम करीत आहेत.
पाकिस्तानातील समाजजीवन, राजकारण, संस्कृती, अस्थिरता, दहशतवाद आदी अंगाने हे पुस्तक वाचता येते. गांधीजींच्या हत्येपासूनच्या घडामोडी पुस्तकात वाचायला मिळतात. पाकिस्तानातील निवडणुका, लाहोर-कराचीतील सभा, राजकीय पक्षांमधील घडामोडी, नेतेमंडळी, विविध संघटना, तेथील न्यायव्यवस्था याची जवळून माहिती पुस्तकातून मिळते.
अरविंद व्यं. गोखले आणि विजय लोणकर यांनी केलेला अनुवादही सरस आहे.