Summary of the Book
मानवी जीवन गुंतागुंतीचे आहे. जन्मानंतर मृत्यू अटळ, तरी तोपर्यंत आयुष्य जगण्याची धडपड प्रत्येकाला करावी लागते. जन्मानंतर जात, धर्म, संस्कृती, देश यांचे आवरण येते. संस्कार, मूल्याचे धडे घेत माणूस मोठा होतो. न्याय, अन्याय, अत्याचार यांच्या चक्रात तो फिरतो. मानवी जीवनातील अंतरंगाचा वेध डॉ. श्रीपाल सबनीस यांनी 'उपेक्षितांची पहाट'मधून घेतला आहे. गुराखी, सालदार, वॉचमन, मोलकरीण, भटके विमुक्त, तृतीयपंथी, आदिवासी व परिस्थितीने पिचलेल्या उपेक्षितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. संस्कृती, विकृती, विद्रोह, क्रांती यावर भाग्य आहे.