Summary of the Book
आकाशातील, ग्रह, तारे, चंद्र, सूर्य तसेच तेथे घडणाऱ्या घटनांबाबत मानवाला फार पूर्वीपासून उत्सुकता आहे. यातून अवकाशाचा वेध घेण्यासाठी त्याचे निरीक्षण, अभ्यास सुरु झाला.
यालाच पुढे खगोलनिरीक्षण किंवा अशा प्रकारच्या अभ्यास शाखेला खगोलशास्त्र म्हटले जाऊ लागले. जगात आतापर्यंत अनेक खगोल शास्त्रांनी अनेक शोध लावले, संशोधन करून नवीन संकल्पना मांडल्या. मानव चंद्रावर पोचला.
या शाखेचा अभ्यास भारतातही फार पूर्वीपासून सुरु आहे. भारतीय शास्त्रज्ञांनीही यात योगदान दिले आहे. जगभरातील अशा शास्त्रज्ञांची ओळख 'खगोलशास्त्रज्ञ'मधून आनंद घैसास यांनी करून दिली आहे.
अॅरिस्टॉटल, इरॅटोस्थेनेस, हिप्पाकर्स, टोलेमी, आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मागुप्त, अल बत्तानी, भास्कराचार्य, उलुघ बेग, नीलकंठ सोमयाजी तसेच अॅनी जम्प कॅनन, अॅन्टोनिया माउरी आदी महिला संशोधक अशा ज्ञात-अज्ञात १०१ खगोलशास्त्रज्ञ, त्यांचे कार्य, त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, उपयुक्त संशोधनाची माहिती यातून मिळते. त्यांच्या मार्गदर्शक कहाण्या सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.