Summary of the Book
मला गोविंद हा या समकालाचा 'लसावि' काढणारा मोठा विचारवंत वाटतो . सुरेश भटांना अभिप्रेत असा गझलकार . ज्याच्या काही ओळी वाचताना चक्क मर्ढेकर आठवतात .
गझलेने कवितेच्या अपेक्षा पुऱ्या कराव्यात , असे मानणारा एक गझल संप्रदाय आहे . त्यांना गझल ही उत्तम कविता असली पाहिजे असे वाटत असते . काही उन्मत लोकांप्रमाणे ते गझलेला कवितेपासून वेगळे काढत नाहीत .गोविंद त्या समंजस पंथातला आहे . म्हणून त्याच्या गझलेत कवितेसारखे , कवितेच्या जवळचे काही आर्त शेर सापडतात .
हा गोविंद रास गरबा खेळणारा गोविंद नाही , तर जगण्याच्या रणात झुंजणारा गोविंद आहे. गझला चंद्र - चांदण्यांपुरत्या मर्यादित न ठेवता तळागाळातल्या सामान्य माणसाच्या समस्यांना कवेत घेणाऱ्या असाव्यात , असे गोविंद मानतो आणि हीच त्याच्या विलक्षण गझलनिर्मिती - मागची शक्ती आहे.