Summary of the Book
आजारी पडून औषध घेण्यापेक्षा आजार होऊच नये, याची काळजी घेणं शहाणपणाचं असतं.
पण आजार होऊ न देणं आपल्या हातात कुठ असतं? खर तर असतं. काही पथ्य पाळली,
तर आजार दूर ठेवता येतो त्यातलं पहिलं पथ्य म्हणजे आहारावर नियंत्रण. ते कसं ठेवायचं,
ते माधव चौधरी यांनी आपल्याला 'आहार हेच औषध' या पुस्तकातून सांगितले आहे.
तमोगुण, रजोगुण, आणि सत्वगुण या तिन्ही धातूंचे समप्रमाण माणसाला निरोगी जीवन देतात.
हे धातू समप्रमाणात कसे ठेवायचे, कमी- जास्त झाले तर आहार कसा ठेवायचा, एकूणच प्रकृतीला
मानवेल असा पोषक आणि सात्विक आहार कसा घायचा, ऋतूनुसार आहारात बदल कसा करायचा
याचं विस्तृत मार्गदर्शन माधव चौधरी यांनी या पुस्तकातून केलं आहे.