Summary of the Book
जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, मल्लिकार्जुन मन्सूर, शोभा गुर्टू, मोगुबाई कुर्डीकर, कुमारगंधर्व या सात कलावंतांच्या गानतपस्येचा वेध . कलावंत होण्यासाठी ज्ञानार्जनाचे मार्ग डोळसपणे शोधावे लागतात. कलावंत हा मूळ कलासाधक, गुरु आणि ईश्वराचा कृपाप्रसाद अशा तीन घटकांचा परिपाक असावा लागतो. या सात कलावंतांच्या बाबतीत या तिन्ही घटकांचा समन्वय झालेला आहे. गायकीचा आकर्षक ढंग त्यांच्या झोळीत कोणी दान म्हणून टाकलेला नाही, तर त्यांच्या आयुष्याच्या अथक परिश्रमातून त्यांनी तो साध्या केला आहे.