Summary of the Book
अहिंसेचा मंत्र सर्वप्रथम भगवान महावीर यांनी दिला. महात्मा गांधी यांनी त्यानुसार आचरण केले. पण सध्याच्या यांत्रिक युगात आपल्याला त्याचा विसर पडला आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, हिंसा, दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे.
जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. यातून माणसाची मनःशांती हरविली आहे. ती परत मिळवायची असेल तर अहिंसा त्याचबरोबर भगवान महावीर यांनी सांगितलेली मैत्री, करुणा, क्षमा व पर्यावरण यांची तत्त्वे आचरणात आणायला हवीत.
त्यांच्या संदेशाचे स्मरण ‘आदर्शऋषि’ यांनी ‘अंतिम महागाथा’ या हिंदी भाषेतील पुस्तकात करून दिले आहे. आधुनिक युगाची प्राचीन विचारांशी सांगड घालत भगवान महावीर यांचे समग्र जीवनदर्शन यात होते.