Summary of the Book
पार्थ पोकळे यांच्या बुद्धधम्म ते धर्मांतर या पुस्तकाची निर्मिती विशिष्ट हेतूने झालेली आहे. त्यांनी या पुस्तकात बुद्धाच्या तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण चर्चा केली आहे. 'स' चा 'ह' होणे हा भाषिक अपभ्रंश झाला पण धर्मतीतता धर्म होणे, हा संस्कृतीचा तिढा झाला, सांस्कृतिक फसवणूक झाली. पहिली भाषिक गाठ सोपी आहे. ती सुटणे सोपी आहे. मला नम्रपणे असें वाटते की ही गाठ सुटण्याच्या प्रक्रियेला आणखी एक आयाम पार्थ पोकळे यांच्या पुस्तकामुळे मिळेल. ती गाठ निदान थोडी हलेल. सर्व वंचितांची मने अंतर्मुख होतील. आपण क्रांतीची छावणी सोडून प्रतीक्रांतीच्या छावणीत कसे आलो याचा विचार करतील आणि देशाच्या जीवनात आपल्याला नको त्या; आपल्याला तुडवणाऱ्या आणि सर्व दृष्टींनी आपल्याला बुडवणाऱ्याच भूमिका का कराव्या लागत आहेत या प्रश्नाने या देशातील आजचे वंचित अंतर्मुख होतील. अशी लेखकाची इच्छा आहे. ही इच्छा फलद्रूप करण्याचे कार्य हे पुस्तक पूर्ण करेल.
डॉ. यशवंत मनोहर