व्यास ऋषींनी महाभारताची रचना केली हे सर्वश्रुत आहे. मानवी जीवनातील मानस, समाज अर्थ, राजनीतीशास्त्र व तत्वज्ञान या पाचही पैलूंचे दर्शन महाभारत होते; पण आधुनिक काळात त्याला एक वेगळी छटा देण्याचा प्रयत्न झाल्याने नवीन पिढीचा महाभारतातील व्यक्तीमत्त्वांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, असे मनोगत व्यक्त करीत डॉ. राघवेंद्र सावळगी आणि मीनाक्षी सावळगी यांनी 'महाभारत व्यक्तिदर्शन' मधून महाभारतातील व्यक्तींचे सकारत्मक चित्रण केले आहे. याची सुरवात होते ती अर्थातच महाभारताचे रचनाकार वेदव्यास यांच्या परिचयाने. प्राप्त परिस्थितीत उत्कर्ष साधण्यासाठी त्यांनी चार लक्ष श्लोकांची रचना केली. या प्रकरणात व्यासांच्या जन्मापासून कार्याची माहिती दिली आहे. यानंतर शंतनूची कहाणी आहे. यात शंतनू- गंगा, शंतनू- सत्यवती विवाह, देवव्रताची भीष्मप्रतिज्ञा, काशिराजाची शापित कन्या अंबा, पांडू व धृतराष्ट्र यांच्यानंतर दुर्योधन, त्याचा परम मित्र कर्ण. गांधारी, विदुर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कुंती, युधिष्टिर, भीम, अर्जुन , द्रोपदी आदी महाभारतातील पात्रांची ओळख यातून करून दिली असून, शेवटी महाभारताचा नायक श्रीकृष्णाचे दर्शन यातून दिसते.
‘महाभारत व्यक्तिदर्शन’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5229094376522986836