Summary of the Book
‘मला येगळ्या वाटंनं जायाचंय्, ही मळल्याली वाट सोडून चालायचय्-’ म्हणणार्या, यल्लम्माच्या कीर्तीचा बाजार मांडणार्या-खोट्या दुनियेविरूद्ध प्राणपणानं बंड करून उठलेल्या जगन जोगतिणीची ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करील.
उत्तम बंडू तुपे यांच्या ‘काट्यावरची पोटं’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पारितोषिक मिळालं.
त्यांच्या ‘इजाळं’ या ग्रामीण कादंबरीनं त्यांच्या लेखनगुणाचा, त्या मागच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेचा समर्थ प्रत्यत आला.
एका बाजूला परशू-दुसर्या बाजूला येलू-मध्ये चालणारी जगन... वाचकाच्या मनात दीर्घकाळ घर करून राहणार्या या व्यक्ती, जोगत्यांचं आजवर अनोखं असलेलं दुर्लक्षित विश्र्व, यांचं अस्वस्थ करणारं चित्रण ‘झुलवा’त आढळेल.