Summary of the Book
काजूची झाडे फक्त कोकण व गोव्यात वाढतात हा समज नागपूर जिल्ह्यातील पडीक जमिनीवर स्वत: काजू लागवड करून डॉ. राहुडकरांनी खोटा ठरवला. त्यादरम्यान त्यांनी देशीपरदेशी पुस्तके वाचून, काजूसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांशी पत्रववहार करून काजू संशोधनाची माहिती मिळवून इतके ज्ञान गोळा केले की,त्याचे फलस्वरूपी हे पुस्तक निर्माण झाले.याच उद्देशाने की कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच काजूची नवी लागवड करू इच्छिणारा देशातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी. इतर नाशवंत फळांप्रमाणे काजूबिया बाजारात विकणाची घाई नसते. अशा फायद्यांमुळे शेतकऱ्यांनी काजूची नवीन लागवड जरूर करावी. लागवडीचा संपूर्ण तंत्रज्ञानासह काजूचा अर्थशास्त्राचे सुरेख विवरण डॉ. राहुडकरांनी या पुस्तकात दिले आहे.