Summary of the Book
ह्या पुस्तकात जीवनाविषयीचं मार्गदर्शन अतिशय साध्या-सोप्या शब्दांत आत्मानंद ह्यांनी केले आहे.
आत्मानंद ह्यांनी हे पुस्तक लिहिण्याविषयीची भूमिका "वैतरणेच्या ऐलतीरी'च्या "मनोगत'मध्ये स्पष्ट केलेली आहे. ते म्हणतात - ""निव्वळ करमणूक म्हणून ज्यांना हे पुस्तक वाचावयाचे असेल त्यांनी कृपा करून ते न वाचलेलेच बरे. यात ललित वाङ्मयाचा किंवा रंजनाचा काहीच भाग नाही. त्यामुळे त्यांना हे पुस्तक कंटाळवाणे व टाकाऊ वाटेल. ज्यांना आपल्या आयुष्यात काही त्रुटी जाणवत असेल, अडीअडचणी वाटत असतील किंवा समाधानी व सुखी आयुष्य कसे जगता येईल याबाबत काही व्यवहार्य, बिनखर्चात, वेळेचा अपव्यय न करता अमलात आणण्यासारख्या सूचना मिळाल्या तर हव्या, असे वाटत असेल, त्यांनीच हे पुस्तक वाचावयास घ्यावे.''