Summary of the Book
मन आहे म्हणून माणूस माणूस आहे
जनावरातून बाहेर येऊन जगता यावं म्हणून
माणसानं निसर्गाकडून मनाची देणगी मिळवली.
मग प्रत्येक माणसात आपल्या आपल्या मनाचा
एक सुभा तयार झाला.
प्रत्येक सुभ्याचं स्वतःचं विश्र्व
आणि माणूस आपल्या सुभ्याचा मालक.
अशा असंख्य सुभ्यांचा पसारा म्हणजे हे जग.
त्यांची एकमेकांतली गुंतागुंत म्हणजे मानवी नाती.
प्रत्येक माणूस आपल्या मनाचा नियंता
आणि त्याच वेळी दुखणाईतही.
ज्याला जमलं आपल्या मनाची सांगड दुसर्याच्या
मनाशी घालणं –
त्याचं जगणं निभलं.
पण ज्याला नाही जमलं, त्याचं जगणं बेकार!
मन आहे म्हणून माणूस आहे
माणूस आहे म्हणून मन आहे
दोघांत सख्य झालं तर ठीक
पण बिनसलंच स्वतःच्या मनाशीही
तर मग माणसाची खैर नाही.