Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
नरेंद्र मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला दणदणीत विजय 2014च्या विजयाची केवळ पुनरावृत्ती नव्हती, तर भारतीय राजकारणातले नीति-नियम स्वत:च्या मर्जीने ठरवण्याची अजस्त्र ताकद एका व्यक्तीच्या हाती एकवटल्याच्या वास्तवावरचं ते शिक्कामोर्तब होतं. मोदींचा चेहरा पुढे ठेवून भाजपने विकासाच्या मुद्द्यावर 2014ची निवडणूक जिंकली होती, 2019च्या निवडणुकीत सर्वंकष सत्तेच्या दिशेने पुढेपुढे सरकणार्या भाजपने मोदींचा वैयक्तिक करिश्मा आणि धर्मकेंद्रीत राष्ट्रभक्तीची आक्रमक जोड दिली होती. यात कॉर्पोरेट पद्धतीचं भविष्यवेधी नियोजन होतं, नैतिक-अनैतिकतेच्या सीमारेषा पुसणारी धडाकेबाज कृती होती, साधन-संपत्तीचा अविरत ओघ होता. सगळ्यात म्हणजे, निवडणूक हे जीवन-मरणाचं युद्ध आहे, ही विरोधकांकडे अंशानेही नसलेली तीव्र भावना होती. हे निवडणूक युद्ध मोदी-शहा जोडगोळीने कसं जिंकलं याची रोमांचक तरीही धडकी भरवणारी कहाणी प्रस्तुत पुस्तकाद्वारे टेलिव्हीजन न्यूज जगतातले नावाजलेले पत्रकार लेखक राजदीप सरदेसाई यांनी उलगडली आहे. त्याअर्थाने, हा एक जनवदंतेपलीकडच्या विश्वाचा, त्यातही मोदी आणि भाजपच्या अंत:पुराचा धाडसी वेध आहे...