Summary of the Book
नारायण धारप यांचा हा काही पहिला कथासंग्रह नाही.
पण त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या द्विशताहूनही जास्त अशा कथांतील वैशिष्ट्ये याही कथांत आहेत.
परिनामकारक भयकथेमध्ये वाचकांना त्यांचा अविश्वास क्षणभर खुंटीवर टांगून ठेवायला लावण्याची जी
किंमया असते ती या कथांमध्ये अवश्य आहे.
धारपांची भाषा चित्रमय आहे. वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना साक्षात्
उभी करण्याचे सामर्थ्य त्या भाषेत आहे.
शिवाय धारपांनी ( आजवरच्या सर्वच भयकथालेखकांनी ) या अमानवी विश्वासाठी जे
एक तर्कशास्त्र निर्माण केलेले आहे त्याच्याशी या सर्व कथा सुसंगत आहेत.
....दिलीप प्रकाशन .