Summary of the Book
कलियुगाचा महिमा म्हणूनच की काय; पण परतत्त्वाचा साक्षात्कार करून देणारी शक्तिपातायोगाची अमोघ, दुर्लभ परंपरा आज अत्यंत थोड्या ठिकाणी तिच्या मूळ विशुद्ध स्वरूपात आस्तित्वात आहे.
आजकाल सगळीकडेच ‘दीक्षा प्रदात्या सद्गुरुंचा’ अगदी सुकाळ झालेला दिसून येतो. ज्यांना आणवोपायाचीही
प्राप्ती झालेली नाही, अशी मंडळी केवळ शब्दज्ञानाच्या शिदोरीवर स्वत:ला ‘परमहंस’ म्हणवून घेताना दिसत
आहेत . हरिभक्तिपरायण, महाराज, स्वामीमहाराज, ब्रह्मर्षि वगैरे विशेषणांची तर मालिकाच अशांच्या नावांपुढे
विराजमान झालेली दिसते. पण दुर्दैवाने, हीच बाजारातील चलनी नाणी आहेत. अशाच पठडीतल्या ‘जाणत्या’
मंडळींकडून सच्च्या परमार्थाची तरी काय अपेक्षा सर्वसामानांनी ठेवावी?
ओघानेच ‘दीक्षा’ या शब्दाचे पावित्र्य घालविणारा किळसवाणा बाजारही यात येतो. आज जो उठला तो
‘शक्तिपातदीक्षा’ देताना दिसतो, यातच सर्व आले. पण यात फसणारा शिष्यांचा तरी काय दोष
म्हणावा? जर खरे शास्त्रज्ञानच त्यांच्या ओळखीचे नसेल, तर त्यांनी तरी कोठल्या मापपट्टीने या ‘सद्गुरुंना’
जोखावे? म्हणून अंधळे शिष्य आणि धूर्त लुच्चे गुरु अशांची हल्ली कोठेच वानवा दिसत नाही.